नवी दिल्ली, ७ मे २०२५ : भारतीय सशस्त्र दलांनी मंगळवारी मध्यरात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ नावाची मोठी कारवाई करत पाकिस्तान आणि पाकिस्तानव्याप्त जम्मू-काश्मीर (PoK) मधील ९ दहशतवादी तळांवर हल्ले केले. ही कारवाई २२ एप्रिल २०२५ रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी करण्यात आली, ज्यात २६ निष्पाप नागरिकांचा बळी गेला होता. या हल्ल्यामागे पाकिस्तानस्थित दहशतवादी संघटनांचा हात असल्याचे भारताने म्हटले …