स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेळेत होतील का?. सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे निवडणुका लांबवण्यासाठी होणारे प्रयत्न आता मर्यादित स्वरूपातच शक्य होणार आहेत. न्यायालयाने दोन महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करत राज्य सरकारला स्पष्ट इशारा दिला आहे.१. चार महिन्यांच्या आत निवडणुका पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जायाला हवा. तथापि, राज्य निवडणूक आयोग योग्य प्रकरणांमध्ये …